Posts

Showing posts from June, 2020

अध्यात्माची विहिर

सदगुरुंची आज्ञा व्हावी, अध्यात्माची विहिर खोदावी | बुद्धीच्या पाणोठ्या जमिनीवर, विवेकाची पहार रुतावी || चित्ताच्या गर्तेत उपसण्या, हरीनामाचे फावडे घ्यावे | खणता खणता, घाम गाळता, निजध्यानाचे घाव द्यावे || विचार-मातीची ढिखळे निघता | होई षड्रीपू-खडकांचा ही निपटा || उन-पाऊशी खेळ जीवनी | परी लक्ष्य कधी न देई त्यजुनी || काळ सरता, शेवटचा तो प्रहार पडता | मायेचे ते कवच भेदुनी, झरा अखंड चैतन्याचा || अलिप्ततेचे लिंपण देऊनी, सत्संगाचा काठ घालूनी | शांतीची मग मोट बांध तू || समाधानाची घेऊनी घागर, ओढुनी दोरी परमार्थी सत्वर | रितेपणाचा ओघ साध तू || जीवनाचे सार्थक करण्या, सदगुरुंना शरण जाऊनी | आंनदाचे लेणे शेंद तू, आंनदाचे जिणे शेंद तू || जय गुरुदेव सादर वंदन कुसुमांजली

"भरुन" राहिलेले दत्तगुरु

** "भरुन" राहिलेले दत्तगुरु ** गाभाऱ्यात समोर शांत प्रसन्न मुर्ती, वातावरणात दरवळणारा पुष्पगंध, धुपाच्या मंद सुगंध लहरी आणि जोडीला गुढ शांतता. सगळ कस आॕल-इन-वन पॕकेज. दर्शन घेणे हा नित्याचाच भाग होता पण आज अवधूत "परके" वाटत होते. तो "परकेपणा" नेमका टिपता येत नव्हता. बरेच दिवसांपासून जे अनेक विचार मनात घोंघावत आहेत त्याचा हा परिपाक होता का? पुर्वी दत्तस्थानांवर जाऊन येण्याची एक ओढ असायची, ती आताशा नव्हती. अरेरे !  नाही जायला मिळाल म्हणून होणारी जीवाची घालमेल आता शांत होती. वाचनात येणाऱ्या अनुभव, अनुभूती यांच काहीच अप्रूप उरल नव्हत. किंबहुना त्यांच वाचन बंद झाल होत. पुजा, ग्रंथवाचन, पारायणे हे ही आपोआप सुटलेल. याचा अर्थ महाराजांवर असलेल्या भक्तिचा अंत झाला की काय? असल्या नसत्या शंका. नाही म्हणायला नित्य सुर्योदय-सुर्यास्ताच्या वेळी करण्यात येणारे अग्निहोत्र,  माळेवरच नामस्मरण आणि ध्यान साधना असे एवढेच काय ते चालू. बरं, अनुभूती वगैरे अस काही म्हणाल तर तस काहीच गाठीशी नाही,  ते असावच असा काही आग्रही नाही आणि ती नाही म्हणून खंत ही नाही. अवधूत. महा...